प्रश्न करायचं काय?..........करता येईल खरं तर............
तुमच्या मोबाईल मध्ये वर्षानुवर्षे सेव्ह केलेले काही नंबर्स आहेत? काही मेसेजेस? ताबडतोब डिलीट करुन टाका.
जे मोबाईलचं तेच डोक्याचं. जुन्या तारखा , जुनी भांडणं , कधी काळी कमी असलेल्या वजनाचे आकडे, कुणाला कोणत्या तारखेला भेटलो ते तपशील काढुन टाका डोक्यातुन हे सारं कोंबलेलं. बघा ..... हलकं वाटेल. नवं काही सेव्ह करायचं तुमच्या मेमरी मध्ये तर स्पेस नको तयार करायला? अपडेट करा तुमची सिस्टिम!!!!!
कोणाशी मैत्री आहे तुमची? जे सारखे किरकिर करतात? त्यांना जगण्यात रस वाटत नाही ? सतत उदासवाणी रडगाणी गातात? आपलं काहीच कसं खरं नाही , सगळं जगच कसं वाईट आहे. लोक कसे वाईट्ट आहेत , आपल्या वाईटावर टपले आहेत अशी सतत भुणभुण करतात तुमच्या डोक्याशी? ताबडतोब मैत्री तोडुन टाका त्यांच्याशी. असे उदास जंतु तुमचं आयुष्य कुजवुन टाकतात. त्यापेक्षा भरभरुन आनंदी जगणार्याम्च्या सहवासात रहा. आनंदी रहा... आणि हो तुम्ही कोणत्या गटात येता? ते पण एकदा तपासुन पहा.
शिकत रहा. मजा येते शिकताना. काय वाट्टेल ते शिका. तुम्हाला येत नसलेली अगदी लहानात लहान गोष्ट शिका, मेंदुवर गंज चढु देऊ नका. मेंदुला सतत उद्योग असलेला बरा. तो खुष, आपण खुष. रिकामं डोकं भुताचं घर असतं माहितेय ना? मेंदुला काम दिल की तो रंग भरायला लागतो.
तुम्हाला पाणी पुरी खायला आवडते? भेळ? लालचुटुक बर्फाचा गोळा? बुढ्ढी के बाल खाताना अजुनही मजा येते? मग करा ना ते !!!!! अगदी लहान छोट्यात छोटी गोष्ट करायला आवडत असेल ते मनापासुन करा. मजा येईल. आपण मोठ्ठे झालो , आता अमुक तमुक करणं बरं दिसेल का असा फालतु विचार आजिबात करायचा नाही. मनापासुन हसा. हसत रहा. ज्यांच्याबरोबर राहुन तुम्हाला हसावसं वाटतं त्यांच्याबरोबर रहा. इतरांना हसवा,दिलखुलास हसा. दिवसातुन एकदा तरी.......!!!!!!!!
त्रास होतोच ना..! माणसांचा होतो घटनांचा होतो, शब्दांचाही होतो. पण त्रास झाला की सोडुन द्यायचं. उगीच मन कुरतडत बसायचं नाही. ज्याने त्रास दिला तो एकदाच दिलेला असतो; पण ते सतत आठवुन स्वताचा त्रास वाढवायचा, वागवायचा. त्या त्रासाच्या आणि चिडचिडीच्या ओझ्याने आपलं जगणं गुदमरतं. "गेला उडत" असा बेदरकारपणा इथे वापरायला हरकत नाही.
काय मनापासून आवडते तुम्हाला? यादी करा आणि जीव लावून ते करा. आवडतो का तुम्हाला हिमेश रेशमिया ? मग लोक काही का म्हणेनात ऐका न त्याची गाणी ! आवडतात का तुम्हाला चित्र काढायला ? मग चित्र काढा. तुम्ही महान चित्रकार नाही होणार. पण चित्र तर काढा !
मनात काही सलतयं का ? डोळ्यात येतय उगाच पाणी ? कसली तरी लागलीय बोचणी? मग बोलून टाका. काढून टाका तो गिल्ट मनातून . मागायची का कोणाची माफ़ी ? आजच मागा. छान हलके वाटेल मनात. कसलीही गिल्ट घेउन जगु नका..... कशाला छाळायचं उगीच स्वत:ला ?
प्रेमांच्या माणसांशी बोलून किती दिवस झाले?
" तुला ती साडी छान दिसते ! ही नको तीच साडी नेस" आसा आग्रह आईला कधी केला होता? बाबांच्या मित्राच्या तब्बेतीची चौकशी कधी केली, आठवतयं? करा. ज्यांच्यावर तुमचे प्रेम आहे त्याना ते जाणवू द्या.
"आय लव्ह यु" म्हणणे सोपे असते म्हणून तर पहा. आणि नसेलच म्हणायचे तर द्या हातात हात..... तो ही पुरेसा बोलका आसतो.....
तुमचे घर वाट पाहत तुमची, तिथल्या भिंती, पडदे, खिडक्याच नाही तर भांडीकुंडीही तुमच्या साठी आतुर आसतात. घरी परता. घरात रहा. घराचे होटेल झाले माणसांची मुळं तुटतात ....
घरट्यातल्या उबेला विसरु नका.... जगण्यातली उर्जा तिथूनच येते......
No comments:
Post a Comment